महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2023 | mahatma gandhi speech in marathi

 महात्मा गांधी जयंती भाषण मराठी 2023 | महात्मा गांधी जयंती भाषण निबंध| mahatma gandhi jayanti bhashan marathi | mahatma gandhi speech marathi pdf

mahatma gandhi speech in marathi:नमस्कार मित्रांनो आजच्या लेखात आज आपण महात्मा गांधीजी यांच्या विषयी मराठी भाषण बघणार आहोत हे  गांधीजींच्या जयंती मराठी भाषण वर्ग ५ ते 10 चे विद्यार्थी आपल्या भाषणाची तयारी साठी वापरू शकता.हे mahatma gandhi jayanti bhashan marathi भाषण तुम्ही गांधी जयंती तसेच पुण्यतिथी या दिवशी तुम्ही आपल्या शाळेमध्ये सादर करू शकतात चला तर मग सुरू करूयात mahatma gandhi speech in marathi भाषणाला.

महात्मा गांधी जयंती पुण्यतिथी भाषण मराठी |  mahatma gandhi bhashan marathi speech
महात्मा गांधी जयंती पुण्यतिथी भाषण मराठी |  mahatma gandhi bhashan marathi speech


महात्मा गांधी जयंती भाषण | mahatma gandhi bhashan marathi 2023 | Mahatma gandhi speech in marathi 

mahatma gandhi jayanti bhashan marathi:सन्माननीय व्यासपीठ,आदरणीय अध्यक्ष,महोदय उपस्थित गुरुजन वर्ग तसेच माझ्या छोट्या आणि मोठ्या बांधवांना माझा सप्रेम नमस्कार, मी आजच्या दिवशी मी तुम्हाला सर्वांचे लाडके असे ज्यांना आपण बापू म्हणून ओळखतो यांच्या विषयी दोन शब्द सांगण्याचा प्रयत्न करत आहे. तरी ते तुम्ही शांतचित्ताने ऐकावे अशी मी अपेक्षा करतो

खादी मेरी शान आहे
करम मेरी पूजा है
सच्चा मेरा करम
और हिंदुस्तान मेरी जान है

अहिंसा आणि सत्याचा मार्ग ने बलाढ्य शत्रूला आणि कठीण परिस्थितीला सामोरे जाऊन त्यावर विजय मिळवणाऱ्या महात्मा गांधीजींना माझा शत शत प्रणाम

आधुनिक काळातील युगप्रवर्तक नेते म्हणून महात्मा गांधीजी यांचे नाव घेतले जाते. भारतीय जनमाणसात यांचा खूप मोठा प्रभाव होता. हे आपल्याला गांधीयुग यावरून दिसून येते.

महात्मा गांधीजी यांचा जन्म 2 ऑक्टोंबर 1869 रोजी गुजरात राज्यातील पोरबंदर या गावी झाला.महात्मा गांधी यांचे संपूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते.त्यांच्या वडिलांचे नाव करमचंद गांधी.तरआईचे नाव पुतळीबाई असे होते.

त्यांची आई ही धार्मिक प्रवृत्तीची होती,त्यांचे बालपण हे धार्मिक वातावरणात गेले म्हणूनच गांधीजी लहानपणापासूनच धार्मिक विचाराचे होते हे आपल्याला दिसून येते.त्यांचे वडील पोरबंदर येथे दिवाण म्हणून कार्यरत होते.त्या काळात बालवयातच लग्न करण्याच्या प्रथेमुळे महात्मा गांधी यांचे लग्न वयाच्या 13 व्या वर्षी झाले. त्यांचे लग्न कस्तुरबा कपाळ या यांच्याशी बालविवाह झाला.

महात्मा गांधीजी हे लहानपणापासूनच लाजाळू स्वभावाचे  व हुशार  होते. महात्मा गांधी 1887 मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. व शालेय शिक्षण संपवून वयाच्या एकोणिसाव्या वर्षी 1888 मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंड येथे गेले तिथे त्यांनी बॅरिस्टर पदवी संपादन केली. 

उच्च शिक्षण संपादन करून 1891 मध्ये ते भारतात परतले व त्यांनी प्रथमच भारतामधील राजकोट येथे वकिली सुरू केली.व पुढे लवकरच ते एका हिंदी कंपनीचे वकील म्हणून 1893 मध्ये दक्षिण आफ्रिका येथे गेले.

व्यापार व कामधंदा निमित्त भारतीय अनेक लोक दक्षिण आफ्रिकेमध्ये स्थायिक झालेले होते, परंतु तेथील गोऱ्या लोकांनी भारतीय लोकांवर वर्णभेदाच्या आधारे अत्यंत अन्याय जुलूम चालवला होता. ते सर्व लोक अतिशय कठीण अवस्थेत हालाखीचे जीवन जगत होते. याच प्रकारची वर्तणूक गांधीजी यांच्यासोबत सुद्धा घडले होते. 

त्यांच्यावर होत असलेला हा अन्याय महात्मा गांधींना कळताच त्यांनी त्याच्या विरुद्ध आवाज उठवण्याचे ठरवले. या सरकारी अन्यायाविरुद्ध व जुलूमशाही विरुद्ध त्यांनी अहिंसक मार्गांनी लढत त्यांनी प्रथमच सत्याग्रहा चा प्रयोग करण्याचे ठरवले.

 गांधीजींच्या सत्याग्रह आंदोलनात अनेक भारतीय सहभागी झाले त्यांच्या आंदोलनामुळे दक्षिण आफ्रिकेची सरकार सुद्धा झुकली होती. भारतीयांना मानवी हक्क देण्यात आले.अशाप्रकारे महात्मा गांधीजींनी दक्षिण आफ्रिका मध्ये सत्याचा प्रथम प्रयोग करून अहिंसक मार्गाने अत्याचारी व जुलमी सत्तेला नमवले.

9 जानेवारी 1915 रोजी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतील विजय संपादन करून भारतात परत ले यानंतर 1917 मध्ये त्यांनी  बिहारमधील चंपारण येथील शेतकऱ्यांना त्यांचे हक्क व जुलमी कर याच्याविरुद्ध तसेच मजुरांची होणारी पिळवणूक याच्याविरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा देऊन तो जिंकला.गुजरातमधील खेडा जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या समस्येवर त्यांनी सत्याग्रहाच्या मार्गाने लढा दिला या दोन सत्याग्रहामुळे त्यांना देशभर प्रसिद्धी मिळाली.

याप्रमाणे त्यांनी ब्रिटिश सरकारविरुद्ध भारत छोडो, सायमन गो बॅक, आणि असे अनेक सत्याग्रह केले. 1942 च्या चले जाव या स्वातंत्र आंदोलन चळवळीचे नेतृत्व महात्मा गांधीजींनी केले होते.महात्मा गांधीजी आणि भारतातील अनेक स्वातंत्र्यसैनिक यांच्या प्रयत्नांना अनेक अखेर यश येऊन अखेर 15 ऑगस्ट 1947 ला भारताला स्वातंत्र्य मिळाले. अशा प्रकारे भारतीय स्वातंत्र्य मध्ये एक गांधीजींनी योगदान दिले.

नोबल पुरस्कार विजेते रवींद्रनाथ टागोर यांनी  गांधीजी यांना महात्मा ही उपाधी दिली तसेच सुभाषचंद्र बोस यांनी गांधीजींना सर्वप्रथम राष्ट्रपिता असे संबोधले. भारतातील जनता त्यांना प्रेमाने बापू असे म्हणत.

गांधी जी हे सत्य अहिंसेचे पुजारी होते. सत्य आज परमेश्वर परमेश्वर सत्य आहे असे त्यांचे म्हणणे होते. सत्याचा शोध घेणे म्हणजेच परमेश्वराचा शोध घेणे होय असे त्यांनी म्हटले होते.

सत्याग्रह हे गांधीजींचे शस्त्र होते.सत्याग्रही गांधीजी नि संपूर्ण जगाला दिलेली महत्त्वाची देणगी आहे.अन्याया व  शोषणाविरुद्ध केलेल्या आत्मिक शक्तीचा वापर म्हणजे सत्याग्रह होय असे त्यांनी म्हटले आहे.गांधीजी म्हणतात अहिंसेच्या मार्गाने च्या शत्रुलाही प्रेमाने जिंकता येते, अहिंसा हे अन्याय व असत्य या विरुद्ध लढण्याची सर्वात प्रभावी साधन आहे.

सर्व जगाला गांधीजींनी अहिंसेचा मार्ग दाखवला म्हणून हा दिवस आंतरराष्ट्रीय 2 ऑक्टोंबर हा अहिंसा दिवस म्हणून साजरा केला जातो.30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधीजींची हत्या नथुराम गोडसे याच्या द्वारे करण्यात आली. 

दिल्लीतील बिर्ला भवनामध्ये गांधीजी फिरत असताना त्यांच्यावर नथुराम गोडसे यांच्या द्वारे गोळ्या चालवण्यात आल्या व यातच महात्मा गांधीजी चा मृत्यू झाला.या थोर राष्ट्रीय युगप्रवर्तक नेत्याला आदरांजली देण्यासाठी दरवर्षी ३० जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून देशभर पाळला जातो.आजच्या दिवशी गांधीजींच्या पावन प्रतिमेला व त्यांच्या कार्याला वंदन करून मी माझ्या भाषणाला पूर्णविराम देते जय हिंद जय भारत.

समाप्त

तर होते गांधी जयंती पुण्यतिथी मराठी भाषण mahatma gandhi speech in marathi . तुम्हाले महात्मा गांधी  भाषण मराठी  mahatma gandhi bhashan mahatma gandhi speech in marathi भाषण कसे वाटले हे कळण्यासाठी खाली कमेंट मध्ये नक्की सांगा.जर तुम्हाला हे भाषण आवडले असेल तर आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर शेअर करा. आणि या भाषणांमध्ये काही त्रुटी असल्यास व पण काही लिहायचे राहून गेले असल्यास आम्हाला धन्यवाद धन्यवाद नक्की कळवा


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या